कार्यक्रमातून नाही तर कृतीतून शिवाजी महाराज अंगीकारा : डॉ. अशोक जिवतोडे
शिव जयंतीच्या विविध कार्यक्रमात डॉ. अशोक जीवतोडे यांचा सहभाग
श्रेयश वानखेडे:
राजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. महाराष्ट्रातील मनामनात स्वाभिमान, स्वातंत्र्य व स्वराज्य जागविले. त्यांनी त्यांच्या जीवनकार्यातून व राजकीय प्रशासन शैलीतून आदर्श कार्यपध्दती रुजविली. त्यांचा जीवनपट तरुणांनी आवर्जून अभ्यासावा. रोज किमान अर्धा तास शिवचरित्राचे वाचन करावे व कार्यक्रमातून नाही तर कृतीतून शिवाजी महाराज अंगीकारा, असे प्रतिपादन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले.
विविध ठिकाणी झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी सहभाग नोंदवून उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले व मिरवणुकीत सहभागी झाले.