डॉ. अभिलाषा ताई गावतुरे यांनी मानले मतदारांचे आभार
श्रेयश वानखेडे:
जनतेच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात अमूलाग्र बदल घडविणारी प्रक्रिया म्हणजे लोकशाही. ही लोकशाही दिवसेंदिवस अधिक मजबूत व समृद्ध व्हावी यासाठी सदैव मी आपल्या सोबत आहे.
लोकशाहीच्या या उत्सवा मध्ये आपण सहभागी होऊन आपला अमूल्य असा मताधिकार बजावला. त्याबद्दल आपल्या सर्वाचे मनस्वी आभार. सर्व सहकारी, अहोरात्र झटणारी जीवाभावा ची माणसं, ज्येष्ठ, युवा, युवती सर्वाचे भरभरून आशीर्वाद मिळाले हे मी कधीच विसरणार नाही. आपणास मनापासुन धन्यवाद देत डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे) यांनी मानले आभार.