नागरिकांची होणारी गैरसोय टाळावे :- ब्रिजभूषण पाझारे
श्रेयश वानखेडे:
मागील काही वर्षापासून धीम्या गतीने सुरु असलेल्या बाबूपेठ रेल्वे उडान पुलीयाच्या बांधकामामुळे त्या मार्गाने रहदारी करणाऱ्या नागरिकांना खूप हलाकीचे जीवन जगावे लागत आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्यामुळे नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांना होत असलेली समस्या येथील नागरिकांनी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या समोर मांडली. त्यांनी पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात संबंधित रेल्वे उडान पुलाच्या बांधकामाचा आढवा घेऊन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग-२, चंद्रपूर यांना निवेदन दिले. सदर उडान पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे.