Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeGadchiroliजपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंश मृत्यूने मन हेलावले; माजी आमदार डॉ. देवराव होळींची...

जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंश मृत्यूने मन हेलावले; माजी आमदार डॉ. देवराव होळींची आश्रमशाळेला भेट.

जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंश मृत्यूने मन हेलावले; माजी आमदार डॉ. देवराव होळींची आश्रमशाळेला भेट.

मृत विद्यार्थिनींच्या पालकांना दिला धीर; आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सुविधांबाबत प्रशासनाशी सविस्तर चर्चा.

*ज्योत्स्ना वानखेडे*: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सर्पदंशामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेची गंभीर दखल घेत भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जपतलाई येथील खासगी आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींप्रति त्यांनी मनःपूर्वक दुःख व्यक्त करत त्यांच्या पालकांचे सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचा विश्वास देत त्यांनी पालकांना धीर दिला.
या भेटीदरम्यान आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आरुषी सिंग व प्रकल्प अधिकारी एम. अरुण यांच्यासोबत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः खासगी व शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, वीज तसेच शाळा परिसरातील सुरक्षितता या विषयांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.
आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणासाठी आश्रमशाळांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि दर्जेदार वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी भूमिका माजी आमदार डॉ. होळी यांनी प्रशासनासमोर मांडली.
यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन मृत विद्यार्थिनींची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत विद्यार्थिनींच्या पालकांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत संवेदना व्यक्त केल्या.
या संपूर्ण घटनेबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने कार्यवाही करावी, तसेच घटनेची योग्य ती चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
“आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन आणि सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. जपतलाईसारखी दुःखद घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी भूमिका माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.
Previous article
*ज्योत्स्ना वानखेडे*: बल्लारपूर येथील प्रवाशांच्या सुविधेत आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली असून राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. या नव्या बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा बल्लारपूर बसस्थानक परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नव्या बसगाड्यांमुळे बल्लारपूर व परिसरातील नागरिकांना अधिक चांगली, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला मोठी सोय होणार आहे. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती: या लोकार्पण सोहळ्यास श्री. हरीशभैया शर्मा, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण, अॅड. रणंजय सिंह, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहर,श्री. काशीनाथ सिंह,श्री. समीर केने,श्री. सतविंदर सिंग दारी ,श्री. गुलशन शर्मा,श्री. सतीश कणकम,सौभाग्यवती वैशाली ताई जोशी, अध्यक्ष, महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहर, सौभाग्यवती रेनुका ताई दुधे, नगरसेविका विद्याताई खडतड, नगरसेविका शालूताई कुमरे, नगरसेवक मोहित डंगोरे, नगरसेवक नीरज झाडे, तसेच महिला मोर्चाच्या महामंत्री सौ. सारिकाताई कणकम, सौ. जयश्रीताई मोहोरले आणि सौ. वर्षाताई सुंचुवार, युवा मोर्चाचे महामंत्री श्री. अरविंद वर्मा, श्री. कैलाश गुप्ता, श्री. बब्लू गुप्ता, श्री. ओमप्रकाश प्रसाद, अध्यक्ष, सुधीरभाऊ यूथ क्लब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या बससेवेचे स्वागत करत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे ही बल्लारपूरसाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनातून आणि पुढाकारातून प्रवाशांच्या सुविधेसाठी होत असलेल्या या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन श्री. देवेंद्र वाटकर जी यांनी केले. कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, महिला व युवा मोर्चाचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते, एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 21 attachment • Scanned by Gmail
Next article
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page