अपूर्वा पॉलीटेक्निक येथे अभियांत्रिकी दिनानिमित्त उद्योग व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
Jyotsna Wankhede: अभियांत्रिकी दिनानिमित्त अपूर्वा पॉलिटेक्निक कॉलेज, सेलू येथे अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीसाठी विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर्स असोसिएशन, सेलू चे अध्यक्ष सुशील नाईकवाडे व पदाधिकारी तसेच टाटा कंपनीचे सुदर्शन धारूरकर, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य प्रा. अशोक बोडखे आणि बजाज कंपनी चे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यांच्या कार्याची ओळख करून देत प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अभियंता दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे सादरीकरण व प्रदर्शन केले. या प्रकल्पांमध्ये शाश्वत विकास, नवोन्मेषी तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्रातील प्रगत साधने, पावसाचे पाणी साठवण, कचरा व्यवस्था पन, ऊर्जा बचत तंत्रज्ञान, तसेच ग्रीन बिल्डिंग या विषयांवर आधारित नवनवीन कल्पना सादर करण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मॉडेल्सद्वारे स्मार्ट रोड, वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम, ट्रॅफिक मॅनेजमेंट यां सारखे समाजोपयोगी प्रकल्प मांडले.अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे केवळ गणित व तांत्रिक ज्ञान शिकणे नाही, तर समस्या सोडवण्याची क्षमता, सामाजिक जबाबदारी आणि नवकल्पना करण्याची वृत्ती विकसित करणे होय. आज सादर झालेले प्रकल्प विद्यार्थ्यां च्या विचारशक्तीचे व आत्मविश्वा साचे प्रतीक आहेत. याच प्रकल्पांच्या माध्यमातून उद्याचे अभियंते समाजासाठी नवीन दिशा ठरवतील.”महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक बोडखे यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “अभियांत्रिकी दिन हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबत नैतिक मूल्यांचा अंगीकार करून जबाबदार अभियंते होणे गरजेचे आहे. आजचे अभियंते हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत.”प्रमुख पाहुणे – इंजिनिअर्स असोसिएशन, टाटा कंपनी व बजाज कंपनीचे मान्यवर – यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमध्ये नवकल्पना, तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक भान यांचा उत्तम संगम दिसतो. आजच्या रोजगाराच्या बाजारात फक्त पदवी पुरेशी नाही, तर प्रत्यक्ष तांत्रिक कौशल्य, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, संवादकौशल्य (communication skills) आणि टीमवर्क या गुणांचे महत्त्व फार मोठे आहे. रोजगार संधी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या गरजा समजून घेत प्रॅक्टिकल नॉलेज व इनोव्हेटिव्ह थिंकिंग विकसित करणे आवश्य क आहे. उद्योगक्षेत्राला सक्षम, कुशल आणि जबाबदार अभियंत्यांची नितांत गरज आहे.”
या कार्यक्रमादरम्यान प्राध्यापकां नीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच डिजिटल कौशल्य, आर्टिफिशि यल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, सॉफ्टवेअर टूल्सचा वापर यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांमधून शिकले ल्या अनुभवांबद्दल सांगितले आणि भविष्यात या प्रकल्पांचा प्रत्यक्ष उपयोग कसा होऊ शकतो यावर विचार मांडले. शेवटी प्रकल्प सादर करणाऱ्या व विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक थिटे यांच्या नेतृत्वा खाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभारप्रदर्शनानंतर अभियांत्रिकी दिनाचे हे आयोजन उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाले.