जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली, वसुमना पंथ पहिल्या महिला जिल्हाधिकारी रुजू

Jyotsna Wankhede:चंद्रपूर जिल्ह्यात मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याने राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती.स्वच्छता, तक्रार निवारण आणि नागरिकांसाठी सुलभ सुविधा यामध्ये चंद्रपूरने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली होती.दरम्यान, २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंथ यांनी चंद्रपूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








