बल्लारपूरच्या एटीएम मध्ये पैशांचा खळखळाट
Jyotsna Wankhede:
बल्लारपूर मध्ये असलेल्या बँकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम सुरू केले आहे. परंतु आता एटीएमची जाऊन तपासणी केली असता बहुतेक एटीएम मध्ये पैशांचा खळखळाट असल्याची घटना समोर आलेली आहे.
ग्राहक आणि व्यापारांसमोर प्रचंड असंतोष पहायला मिळत आहे. काही बँकांनी आपले एटीएम शटल पाडून बंद करून ठेवले आहे. ग्राहक व व्यापारी पैशासाठी एटीएम मध्ये फिरत आहे.
काही ग्राहक दुकानात व्यापारांकडे जातात पाचशे रुपयांचा सामान घेतात व पाचशे रुपये व्यापाऱ्यांना मागतात. अशाप्रकारे हजार रुपयाचा फोन पे किंवा गुगल पे मारतात. व्यापारांकडे मोठे व्यापारी जेव्हा रक्कम घ्यायला येतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेशी रक्कम त्यांना देण्यासाठी राहत नाही.
रिझर्व बँकेचे आदेशानुसार बँकांनी ग्राहक व व्यापाऱ्यांची ही अडचण दूर करावी अशी मागणी जोर धरत आहे.