हाताने पाणी शिंपून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न
Jyotsna Wankhede: नागपूर- बल्लारपूर-आलापल्ली मुख्य रस्त्यावर संबंधित विभागाद्वारे रस्त्यावरील धूळ उडू नये, यासाठी हाताने पाणी शिंपून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.
पाहणी केली असता एका गाडीवर दोन ड्रम ठेवून, ड्रम मधून पाणी काढून हाताने शिंपून रस्ता ओला केला जात आहे. यामध्ये रस्ता पूर्णपणे ओला होत नाही. आणि एखाद्या ठीगळासारखे दिसत आहे. यासंबंधी संबंधित विभाग बिल मात्र पूर्ण उचलत आहे.