Friday, July 10, 2026
HomeAmaravati*अमरावती शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर लगाम खेचण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या...
spot_img

*अमरावती शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर लगाम खेचण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजात बदल करण्याची गरज–आ.संजय खोडके*

*अमरावती शहरातील  गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर लगाम खेचण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजात बदल करण्याची गरज–आ.संजय खोडके* 

*तदर्थ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याबाबत  पावसाळी अधिवेशनातून मागणी* 

*सुरक्षेच्या दृष्टीने तीन नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, सीसीटीव्ही कॅमेरे व  प्रभावी ट्राफिक व्यवस्थेची मागणी* 

*ज्योत्स्ना वानखेडे*: राज्यात पोलीस विभागाची कामगिरी सुधारत असून गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी  गृहविभागाचे चांगल्या पद्धतीने काम सुरु आहे. मात्र  अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये सारख्या गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या घटना वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. अमरावती शहरातील  गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर लगाम खेचण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालय पूर्णपणे हतबल झाले असल्याचे दिसत असून पोलीस विभागाच्या कामकाजात बदल करण्याची नितांत गरज असल्याचे सांगून आ.संजय खोडके यांनी अमरावतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुह विभागाने लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी केली. अमरावती पोलीस विभागात कार्यरत तदर्थ पोलीस निरीक्षक – संदीप चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा आ.संजय खोडके यांनी अधिवेशनातून केली आहे.

आमदार संजय खोडके यांनी सभागृहात बोलतांना सांगितले कि, अमरावती शहरात एम.डी ड्रग्स,पासून ते प्रतिबंधित मादक पदार्थ असे अवैध धंदे सर्रासपणे सुरु असून यावर पोलिस प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने  दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत चालले असल्याने गुन्हेगारीचा रेशो वाढत असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दर दोन दिवसाआड अमरावतीमध्ये हत्या सारख्या घटना घडत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा कुठलाही अंकुश राहला नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा दहशत पसरली आहे. अमरावती शहरातील गुन्हेगारी कमी करण्यास पोलीस यंत्रणा हतबल असल्याने त्यांच्यावर कुणाचा दबाब आहे का? पोलीस विभागाचे अवैध धंदेवाल्यांशी साटेलोटे तर नाही ना? अशी सारशंका सुद्धा आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केली असून अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी गृह विभागाने जातीने लक्ष देण्याची मागणी सभागृहासमक्ष केली आहे.

आमदार- संजय खोडके यांनी  गुन्हे शाखेचे माजी पोलीस निरीक्षक – संदीप चव्हाण यांच्या नियुक्तीवर सुद्धा  प्रश्नचिन्ह निर्माण करून  चौकशी सुरु असलेला व भ्रष्ट्राचाराचे आरोप असतांनाही संदीप चव्हाण यांना क्राईम पीआय म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे सांगून पोलीस विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. आ. संजय खोडके यांनी म्हटले कि,  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करतांना  पोलीस महासंचालक यांच्या काही मार्गदर्शक सुचना आहेत, सर्वप्रथम सदर अधिकारी बी प्लस वर्गवारीतील असावा , व किमान दोन पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव महत्वाचा आहे. त्यांच्या विरोधात कुठलीही चौकशी चालू नसावी तसेच गुन्हा दाखल नसावा.  अशी व्यक्ती गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम करण्यासाठी पात्र ठरत असते. मात्र अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण हे या पात्रतेत बसत नसून  त्यांना ६ महिने कैद झाली असून अँटी करप्शनच्या जाळयात सुद्धा ते अडकले होते.  अशा वादग्रस्त व्यक्तीला अमरावती मध्ये पदोन्नतीवर गुन्हे शाखेत तात्पुरते पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. या संदर्भात पोलीस आयुक्तांना सूचना केली असतांना सुद्धा ते संदीप चव्हाण यांना अभय देण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे पोलीस विभाग राज्यामध्ये चांगले काम करत असतांना अमरावतीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत मार्च अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला असता व मुख्यमंत्रीमहोदयांकडे तक्रार केली असता आता कुठेतही त्यांची बदली करून राजापेठ  पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मात्र संदीप चव्हाण यांच्यावर बदली करून चालणार नाही तर त्यांना अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ठोस कारवाई  करण्याची मागणी आ. संजय खोडके यांनी विधानपरिषदेतून केली आहे.

पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावात गृह विभागासंदर्भात बोलत असतांना  आ.संजय खोडके यांनी अधोरेखित केले कि,  गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीचा आलेख कमी झाला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात पोलिसांची कामगिरी अत्यंत चांगली असल्याने सायबर गुन्हे असो अथवा अंमली पदार्थ विरोधी कारवाई असो यात पोलिसांनी सुमार कामगिरी केली आहे. यात गृह विभागाच्या वतीने पोलिसांना मिळणारे पाठबळ सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे अमरावती पोलीस विभागाला सुद्धा चांगले पाठबळ देण्याची गरज आहे. अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पोलीस स्टेशनची संख्या हि १० वरून अधिक वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी तपोवन , साई नगर व एमआयडीसी या तीन नवीन पोलीस स्टेशनचा सुद्धा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, तो मान्य करावा , अशी विनंती सुद्धा आ. संजय खोडके यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असतांना  केली.

तसेच पोलीस कल्याणच्या दृष्टीने अमरावती शहरातील पोलीस वसाहत निर्माण करण्याचा प्रस्ताव व शहरात विविध ठिकाणी  सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचे आ.संजय खोडके अधिवेशनात म्हणाले. तसेच ट्राफिक व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे , त्यांनी केवळ टार्गेट बेस चालान देण्याचे काम न करता वाहतूक सुरळीत व नियंत्रित राखण्यासाठी चोख भूमिका बजावण्याचा सल्ला सुद्धा आ. खोडके यांनी दिला . तसेच होमगार्ड यांच्या ड्युट्या मर्यादित न ठेवता त्यांना पूर्णवेळ ड्युट्या देण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात यावी. होमगार्ड जवानांना पोलीस सेवा भरतीच्या निकषानुसार वयात सुद्धा सवलत देण्याची सूचना आमदार महोदयांनी सभागृहासमक्ष केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page