सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजू झोडे.
श्रेयश वानखेडे:
बल्लारपूर शहरा लगत बल्लारपूर शहरालगत असलेल्या विसापूर टोल नाका इथे दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 7.00 वाजता बिनावती जीवने वय 50 यांचा टोल नाक्याच्या नव्यानेच बांधलेल्या गतिरोधकावर गाडी उसळून मृत्यू झाला.
हे सत्यता ही आहे की सदर गतिरोध हा नियमाबाह्य होता. व त्या गतिरोधावर सावधानतेचा कोणतेही चिन्ह लावले नव्हते. बिनावती जीवने याचा मृत्यू झाला. या मृत्यू पूर्णपणे जबाबदार हे टोल नाका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. अशी तक्रार पोलीस स्टेशन ला दिली असून 24 एप्रिल पर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही, तर 24 तारखेला हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल व व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा उनगलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.