श्रेयश वानखेडे:
थापर हायस्कुल बल्लारपूर येथे विद्यार्थ्यांना आणापानसती ध्यानाचे महत्व पटवून देतांना धम्ममित्र भास्कर भगत यांनी वरील उद्गार काढले. व्यक्तिमत्व विकास घडविण्यात आणापानसती ध्यान सतत केल्याने एकाग्रता निर्माण होण्यास मदत होते.तसेच जागृती निर्माण होऊन अकुशल व कुशल समजून घेण्यास मदत होते. अकुशल कर्म करण्यापासून परावृत्त होत असतो.अभ्यास करतांना एकाग्रता साधू शकतो.
मुलांना आणापानसती ध्यानाचा सराव घेण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक बारेकर सर, डॉ. वंगलवार, शिक्षक वृंद अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.