शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात सत्यता पडताळणीसाठी एसआयटी ? आ.भाई जगताप
श्रेयश वानखेडे:
विधिमंडळ सदस्य भाई जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक ११ जुन ला निवेदनाद्वारे शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर एस आय टी नेमण्यासाठीची मागणी केली आहे, यापूर्वी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांना दिनांक २४ एप्रिल २०२५ यांना शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी व संबंधित दोषी विरुद्ध कारवाई साठी एस आय टी नेमण्यासाठीची मागणी निवेदनात करण्यात आली होती.
खाजगी शाळा शिक्षक संघाने नागपूर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणी केलेल्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनात शासनास अवगत करण्यात आले होते असेही म्हटले आहे त्याची प्रत निवेदना सोबत जोडलेली आहे.
शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर नियंत्रणासाठी व सत्य बाहेर येण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी ही निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.